सध्या महिला क्रिकेट प्रीमियर लीग सुरू आहे. त्याबद्दल आज वाचण्यात आलेले...
काही खेळाडूंना काही कोटी रुपयात काही संघांनी विकत घेतले. परंतु या खेळाडूंचा खेळ अतिशय पडेल होतो आहे. एका संघाने तर अजून एकही सामना जिंकलेला नाही.
......
माझी टिप्पणी :
खेळासाठी एवढा पैसा द्यावा का हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही, किमान ज्यासाठी पैसा मिळाला आहे त्याचे रिटर्न्स द्यायला नकोत का? त्यासाठी काहीही नियम नाहीत. खेळ ही बेभरवशाची गोष्ट असते असं म्हणून दुर्लक्ष करायचं का?
- शेती ही पण बेभरवशाची गोष्ट नाही का? त्यांना खेळासारखी वागणूक का नको?
- कोणतीही जबाबदारी नसलेल्या गोष्टींवर अमाप पैसा ओतण्याचे कौतुक वाटणारे तुम्ही आम्हीच नंतर; देशाची आर्थिक स्थिती, आर्थिक विषमता, दारिद्र्य इत्यादी गोष्टींवर कथ्याकुट करतो. यापेक्षा हास्यास्पद आणि लाजिरवाणे काय असू शकते?
- श्रीपाद कोठे
१४ मार्च २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा