एका पोस्ट वरील प्रतिक्रिया -
जीवनाचं ध्येयच पैसा, अधिक पैसा, अधिक अधिक पैसा... हे झालेलं आहे. कोणताही व्यवसाय, कोणताही उद्योग, कोणतीही सेवा, कोणतीही व्यक्ती... अशा स्थितीत काय करणार कोणी? जीवनाचं ध्येय, जीवनाचा आशय बदलायला हवा आहे. त्यासाठी सशक्त आवाहन हवं आहे. त्या आवाहनाचा परिणाम होण्यासाठी किंमत चुकवणाऱ्या आयुष्यांचे तारण हवे आहे. कुठे आहे हे सगळे? आप्तांशी लढाई ही फक्त कुरुक्षेत्रावर नसते. अनेक ठिकाणी असते. ती करणारे अर्जुन आणि त्यासाठी उद्युक्त करणारे कृष्ण कुठे आहेत?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा