समजूतदारपणा म्हटलं की आजकाल अनेकांच्या भुवया उंचावतात. अनेक हिंदुत्ववाद्यांच्या. जणू काही समजूतदारपणा हे पाप आहे असं त्यांचं ठाम मत असतं. अशांना एक विचारावं वाटतं की, लोक कुलुपे लावत नसत किंवा भारतात कुठेही भिकारी नव्हते; हे हिंदू समाजाचं character कसं निर्माण झालं आणि टिकलं? भारतात तर काही क्रांती वगैरे झाल्याचा इतिहास नाही. किंवा इथला माणूस सुद्धा जगातल्या इतर माणसांसारखाच आहे. मात्र इतरांपेक्षा त्याचं वेगळं character कसं निर्माण झालं? ज्याचा सगळ्यांना गौरव आणि हेवा वाटावा असं हे character समजूतदारपणा यापेक्षा अन्य कोणत्या गोष्टीने निर्माण होऊ शकलं असेल? अगदी वर्तमान उदाहरण घ्यायचं तर; ईशान्य भारतात हिंदुत्वाने जे ठामपणे पाय रोवले ते कसे? समजूतदारपणाला तीलांजली देऊन की, समजूतदारपणाच्या भरवशावर? क्रांती आणि क्रांतिकारक पृथ्वीच्या पाठीवर कुठेही कधीही यशस्वी झालेले नाहीत. क्रांती आणि मांजर आपलीच पिले खाऊन टाकतात. आजचे हिंदुत्वाचे उत्थान देखील हिंदुत्वाच्या समजूतदार प्रवाहाचा परिणाम आणि यश आहे. And to be blunt ... हिंदुत्वाचे क्रांतिवादी प्रवाह काहीही करू शकलेले नाहीत.
#श्रीपाद कोठे
६ फेब्रुवारी २०२४
- ललित कला प्रकरणावर तू काही प्रतिक्रिया नाही दिली?
- हं. नाही दिली.
- तरी...
- हे प्रकरण पुढे आलं तेव्हापासून दोन गोष्टी आठवत आहेत. १) पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्य : गणपतीला बुशकोट घालणे म्हणजे आधुनिकता नाही, आचरटपणा. २) संघाच्या एका गीताची एक ओळ : दानवता का तीमिर हटाने, तीलतील कर हम जलना सीखे...
@@@@@
दानवताका तिमिर हटाने तिल तिल जलतांना
यात कधी कधी ताडन कर हम जीना सिखे... असे होऊ शकते. गरज तिमिराचा पडदा हटवणे ही आहे.
(किशोर पौनिकर)
तीमिराचा पडदा कोणत्याही शक्तीने हटवल्याचं मी तरी कधी कुठे ऐकलं, पाहिलं नाही. तिमिर हटवण्याचा मला माहिती असलेला एकमेव मार्ग म्हणजे दिवा उजळणे. पेटत्या दिव्यांची संख्या वाढवणे. अन्य मार्ग असेल तरी मला ठाऊक नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा