तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करावं, हे नारायण मूर्ती यांचं मत न पटणारं आहे. हा भांडवलशाही विचार आहे. उलट आठवड्यात सहा दिवस रोज पाच तास काम आणि एक दिवस सुटी असं हवं. पाच पाच तासांच्या तीन पाळ्या असाव्या. याने अधिक लोकांना काम मिळेल. जास्त efficiently काम होईल. अन् माणसाचा बैल किंवा गाढव न होता (खरं तर बैल आणि गाढव यांच्याकडून पण मर्यादितच काम करून घ्यायला हवं.) तो माणूस म्हणून जगू शकेल, विकसित होऊ शकेल. काम कशासाठी करायचं याचाही मुळातून विचार करायला पाहिजे. केवळ उत्पादन वाढवा (पक्षी पैसा वाढवा) हा तर्क निरर्थक आहे.
#श्रीपाद कोठे
२८ ऑक्टोबर २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा