ग्रापंचायतींच्या निवडणुका पक्षीय आधारावर नसतात तरीही सगळेच पक्ष आपापले दावे करतात. मग पक्षीय आधारावरच निवडणूक का घेऊ नये? एक तर सरळ सरळ पक्ष आधारित निवडणूक घ्यावी किंवा त्यापासून पक्षीय राजकारण पूर्णपणे वेगळे ठेवावे. पण आत्यंतिक ढोंगी असलेला आपला समाज असे करेल का? शक्यता कमीच वाटते. समाज म्हणून आपण दुतोंडी आणि ढोंगी आहोत. मुळात आपण एक चांगला समाज असायला हवं असं ७०-८० टक्के लोकांना वाटतच नाही. त्यामुळे अनेक चर्चा फक्त वांझ चर्चा असतात. त्यांना फारसा अर्थ नसतोच.
- श्रीपाद कोठे
७ नोव्हेंबर २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा