परवा नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. तिथली वैशिष्ट्ये काय वगैरे चर्चा सुरू आहे. त्यात तिथल्या हिरवळीचा उल्लेख आहे. सोबत एक सुचवावेसे वाटते - दोन्ही सभागृह मिळून जेवढे खासदार आहेत तेवढे वृक्ष (वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर असे) या परिसरात लावावे. चकचकीतपणा ही पाश्चात्य विकासाची कल्पना आहे. वनातील आश्रम इत्यादी भारतीय कल्पना आहे. (उदा. शांतिनिकेतन) बदललेल्या काळातील संसद सुद्धा वनात असायला (भरपूर दाट झाडीत असायला) काय हरकत आहे? अन् सध्यातरी भारताला शहाणपण शिकवण्याची कोणाची शक्ती, इच्छा अन् तयारी नाही. भारत म्हणेल, करेल त्याला जग बऱ्यापैकी मान डोलावतं. पंतप्रधानांना वाकून नमस्कार पण करायला लागलं आहे जग. तेव्हा खासदारांच्या संख्येएवढे वृक्ष सेंट्रल व्हिस्टा परिसरात लावावे.
- श्रीपाद कोठे
२६ मे २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा