स्थानिक प्रशासनाचे लोक अनेकदा वेगवेगळी माहिती विचारायला घरोघरी जातात. पाणी साचलं आहे का? कुलर लागले आहेत का? घरात कोणी आजारी आहेत का? अशी वेगवेगळी माहिती. एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना योग्य ती माहिती देणं आपलं कर्तव्य असतं. पण बहुसंख्य लोक त्यांना फुटवण्यात धन्यता मानतात. हा फक्त व्यक्तिगत अवगुण नाही म्हणता येणार. हे एक प्रकारे सामाजिक पाप म्हटलं पाहिजे.
- श्रीपाद कोठे
५ मे २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा