काल पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत एका अनोख्या उपक्रमात सुमारे ५० हजार पुस्तके रस्त्यावर मांडून ठेवली होती. कोणीही ती पुस्तके पाहू शकत होते आणि त्यातील एक पुस्तक काहीही पैसे न देता घेऊन जाण्याची प्रत्येकाला मुभा होती. ज्यांनी हा उपक्रम केला त्यांचे अभिवादन आणि अभिनंदन. एवढी पुस्तके जमा करणे, मांडून ठेवणे आणि पुन्हा आवरणे ही कामे सुद्धा अचाटच. त्यामुळे आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच. या उपक्रमाला हजारो लोकांनी भेटही दिली. त्यामुळे उपक्रम यशस्वी झाला असेच म्हटले पाहिजे. हेही छानच.
... पण, एक प्रश्न मनात येतोच की; पुस्तक फुकट मिळणार म्हटल्यावर हजारोंनी गर्दी करणारे आपण; पुस्तकं विक्रीच्या जागी त्याच्या किमान अर्धी गर्दी करतो का? करू का? व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही मला हे प्रश्न मोलाचे आणि महत्त्वाचे वाटतात. समाजाची गुणवत्ता फक्त वाचून वाढत नाही, वाचन आणि पुस्तके यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आणि attitude हेही तितकेच महत्त्वाचे असतात. असतातच.
- श्रीपाद कोठे
२४ एप्रिल २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा