कालचा माझा स्मृती मंदिरावरील लेख एका आघाडीच्या, स्वनामधान्य दैनिकाने आठ कॉलम बातमी करून छापला आहे. मला न सांगता, न विचारता. त्यावर माझी प्रतिक्रिया -
😀😀😀
माझी तक्रार नाही. अन श्रेय वगैरेसाठी धडपडणाराही मी नाही. समाज माध्यमावर लेख असल्याने परस्पर वापरला त्यासही हरकत नाही. आजकाल हे सर्रास चालतं. असं करणाऱ्याची व्यक्तिगत विकृती वा दोष म्हणून आता सगळे त्याकडे पाहू लागले आहेत. मात्र एका जबाबदार वृत्तपत्राने असे करावे? या वृत्तपत्राकडे किमान कृतज्ञता नसावी याची गंमत वाटते. संपूर्ण लेखही नावासह घेता आला असता. किंवा बातमीत एक बाईट टाकता आला असता. असो. मी जर लेख म्हणून पाठवला असता किंवा त्याबाबत विचारलं असतं तर घेतला नसता किंवा मोठाच आहे वगैरे केलं असतं. (अनुभवावरून म्हणतो आहे.) तरीही असो. अशाच गोष्टींना दरोडा म्हणतात ना? इंग्रजांनी भारतात केलं ते काय वेगळं होतं?🙏
(या पोस्टमुळे काय होईल? फार तर माझ्यावरील बहिष्कार आणखीन वाढेल. Who cares? नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी... जिणे गंगौघाचे पाणी...)
- श्रीपाद कोठे
६ एप्रिल २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा