- आपण खरंच गोंधळी समाजच आहोत का?
- समाजाच्या सवयी, चालीरीती overnight बदलत नसतात आणि घट्ट धरून ठेवल्या तरी कायम राहत नसतात; हे समजायला खूपच अवघड आहे का?
- जुने शब्द, प्रचलित शब्द, संकेत, रीती इत्यादी गोष्टीत मान अपमान करणे हा शहाणपणा म्हणावा का?
- बदल समाजाच्या वेगाने आणि समजूतदारपणाने का होऊ नयेत? प्रत्येक गोष्टीत वाद कशाला?
- इंग्रजीतील widow शब्द वगळला आहे का?
- रामायण, महाभारतात, भागवतात - कौसल्या, सुमित्रा, कैकयी, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, द्रौपदी, कुंती, गांधारी, रुक्मिणी - या नावांमागे काहीही लावलेले नाही.
- गार्गी, मैत्रेयी, भारती आदी नावेही कोणत्याही prefix शिवाय आहेत.
- समाजाची प्रवाहितता लक्षात न घेता संस्कृती, धर्म आदी गोष्टींवर तोंडसुख हे कशाचे लक्षण मानावे?
- श्रीपाद कोठे
१३ एप्रिल २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा