शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

गोंधळी समाज

- आपण खरंच गोंधळी समाजच आहोत का?

- समाजाच्या सवयी, चालीरीती overnight बदलत नसतात आणि घट्ट धरून ठेवल्या तरी कायम राहत नसतात; हे समजायला खूपच अवघड आहे का?

- जुने शब्द, प्रचलित शब्द, संकेत, रीती इत्यादी गोष्टीत मान अपमान करणे हा शहाणपणा म्हणावा का?

- बदल समाजाच्या वेगाने आणि समजूतदारपणाने का होऊ नयेत? प्रत्येक गोष्टीत वाद कशाला?

- इंग्रजीतील widow शब्द वगळला आहे का?

- रामायण, महाभारतात, भागवतात - कौसल्या, सुमित्रा, कैकयी, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, द्रौपदी, कुंती, गांधारी, रुक्मिणी - या नावांमागे काहीही लावलेले नाही.

- गार्गी, मैत्रेयी, भारती आदी नावेही कोणत्याही prefix शिवाय आहेत.

- समाजाची प्रवाहितता लक्षात न घेता संस्कृती, धर्म आदी गोष्टींवर तोंडसुख हे कशाचे लक्षण मानावे?

- श्रीपाद कोठे

१३ एप्रिल २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा