- सगळी बोटं सारखी नसतात.
- पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवम पय:, जातौ जातौ नवाचार:, नवावाणी मुखे मुखे (संस्कृत : चुकभूल देणेघेणे)
- तरीही त्यांच्यात भांडणं, वाद, योग्य, अयोग्य, श्रेष्ठ, कनिष्ठ, महान, लहान; असं काही नसतं.
- कोणत्याही गोष्टीला अनेक बाजू असू शकतात.
- फक्त मीच सत्य असे नाही.
ही भारतीयता... हे हिंदुत्व...
@@@@@@@@@@@@
- सगळी बोटं सारखी का नाहीत? उत्तर द्या. बोटं सारखीच असायला हवीत. बोटं सारखी नाहीत यात तुम्हाला काहीच चूक वाटतं नाही म्हणजे तुम्ही निरर्थक आहात.
- सगळी माणसं, त्यांचे विचार, व्यवहार, भाषा... सगळं सगळं साच्यातून काढलेलं हवं. तसं नसेल तर लढाई करावी आणि आपल्यापेक्षा वेगळा असणाऱ्याला संपवून टाकावं. कारण तो चूक आणि अयोग्य असतो.
- कोणत्याही गोष्टीला एकच बाजू असते. एकच बाजू असायला हवी.
- फक्त मीच सत्य. सत्याचे माझेच निकष सत्य.
ही आधुनिकता... हे पुरोगामित्त्व...
@@@@@@@@@@@@
Thank god I am not पुरोगामी and आधुनिक.
- श्रीपाद कोठे
१३ एप्रिल २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा