अवमान या मुद्यावर तीन वाद सध्या गाजतायत. एक राहुल गांधी आणि मोदी. दुसरा काँग्रेस आणि सावरकर. तिसरा धीरेंद्र शास्त्री आणि साईबाबा. हे तीन आत्ता या क्षणी चर्चेत असलेले. जुने वा याहून कमी चर्चेत असणारे, छोट्या परिघातले अनेक असतील. व्यक्तिगत जीवनात तर असंख्य असतात. एका वाहिनीवर ताज्या वादांच्या संदर्भात चर्चा सुरू होती. अॅंकरने प्रश्न उपस्थित केला - is defamation a legal issue or political or judicial? अवमान हा नेमका कोणता प्रॉब्लेम आहे? ती चर्चा नेमक्या प्रश्नापर्यंत पोहोचली पण पुढे सरकली नाही. वास्तविक या चर्चेची गरज आहे की, अवमानाचं बीज कुठे असतं? ते माणसाच्या मनात, माणसाच्या कोतेपणात, माणसाच्या द्वेषबुद्धीत, माणसाच्या स्वार्थादी भावनांमध्ये असतं, माणसांच्या अविश्वासात असतं. त्यावर राजकीय वा वैधानिक वा न्यायालयीन तोडगा कसा काढता येईल? तात्पुरता वाद शमवणे, दंड वा शिक्षा करून passive समाधान मिळवणे हे होईल. एखाद्याच्या मनातील अवमान भावना जाहीर व्यक्त होण्याला थोडा आळा कदाचित बसू शकेल. पण त्याच्या मनात ती भावना खदखदत राहीलच. उलट अधिक तीव्र होईल. अन् त्याच्या त्याच्या वर्तुळात तर खाजगीपणे व्यक्तही होत राहील. त्यामुळे अवमान या विषयाचा एकूणच वेगळा, स्वतंत्र, मूलभूत विचार करणे गरजेचे आहे. अर्थात... असो...
भ्रष्टाचार हाही विषय असाच म्हणता येईल.
दंगल कोण करतं?
दंगल कशी टाळायची?
दंगलीवर नियंत्रण कसे मिळवायचे?
जबाबदारी कोणाची?
जबाबदार व्यक्ती, संस्था, प्रशासन यांना शिक्षा काय द्यावी?
या सगळ्याची चर्चा करतो आपण, पण...
दंगल का होते?
यावर का बोलले जात नाही?
- श्रीपाद कोठे
५ एप्रिल २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा