अखंड भारत ही भौगोलिक आणि प्रशासकीय कल्पना नाही. भौगोलिक आणि प्रशासकीय एकत्व (अखंडता) हा अखंड भारत या कल्पनेच्या परिणाम असेल. शिवाय अखंड भारत म्हणजे हिंदू मुसलमान समस्या नाही. श्रीलंका, ब्रम्हदेश आदी मुस्लिमांमुळे भारताबाहेर गेले नाहीत. तसेच सातव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत हिंदू मुसलमान संघर्ष या देशात सुरू होता. तरीही भारत खंडित झाला नाही. याचा खोलवर विचार करावा लागतो. अखंड भारत ही एक मानसिक अवस्था आहे. भौगोलिक व प्रशासकीय एकत्व हा त्याचा परिणाम असेल.
#श्रीपाद कोठे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा