बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

नरेंद्र दत्त आणि विवेकानंद

लोकसभेत आज झालेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत द्रमुक पक्षाचे टी. आर. बालू बोलले. ते जे काही बोलले त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. परंतु त्यांनी केलेला एक उल्लेख मात्र खटकला आणि योग्य वाटला नाही. आपल्या भाषणात त्यांनी नरेंद्र दत्त यांची विधाने उद्धृत केली. श्री. बालू आणि त्यांचा पक्ष यांचा धर्म, अध्यात्म इत्यादी गोष्टींना विरोध असू शकतो पण जग ज्या नरेंद्र दत्त यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतं त्यांचा विवेकानंद म्हणून उल्लेख न करणे अनुचित तर आहेच पण अवमान करणारेही आहे. याचे कारण म्हणजे स्वामीजी संन्यासी होते. संन्यासी परंपरेत आधीचे नाव विसर्जित झालेले असते. तसेच स्वामीजींचे नरेंद्र दत्त हे नाव विसर्जित झाले होते. ती फक्त एक मृत माहिती आहे. द्रमुक पक्ष आणि श्री. बालू यांना या संन्यासी परंपरेबद्दल श्रद्धा नसू शकते. त्यांना श्रद्धा असायलाच हवी असेही नाही पण त्याबद्दल आदर नसावा आणि सौजन्य नसावे हे त्यांचे खुजेपण दाखवणारे आहे. एवढाच तिरस्कार मनात असेल तर त्यांची विधाने आधाराला तरी का घ्यावीत?

- श्रीपाद कोठे

८ ऑगस्ट २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा