मा सरस्वतीने किती शाळा काढल्या असा उर्मट सवाल करणाऱ्याला खडे बोल ऐकवायलाच हवेत. विशेषत: अशी वटवट करणारी व्यक्ती उच्चपदस्थ असेल तेव्हा. अहो भुजबळ साहेब, तुम्ही समाजाचं दुर्दैव आहात. सावित्रीबाई महान आहेतच कारण त्यांच्या ठायी संघर्ष करण्यासोबतच कृतज्ञ बुद्धी होती. आपल्याला शाळा काढण्याची बुद्धी माता सरस्वतीनेच दिल्याची कृतज्ञ जाणीव त्यांच्या ठायी होती. तुम्हाला मात्र सरस्वतीने कृतज्ञ बुद्धी दिली नाही. खूप मोठं होऊन सुद्धा कृतज्ञ असणं हेच मोठेपणाचं लक्षण असतं. तुमच्या ठायी कृतज्ञते ऐवजी कृतघ्नताच ठासून भरली आहे. माता सरस्वतीची उपासना केल्याशिवाय कृतज्ञता प्राप्त होत नाही. अन् ती नसल्यामुळे तुम्ही खूप लहानच नाही क्षुद्र झाला आहात. बाकी तुमच्या मनातलं जातीयवादाचं डबकं इतकं घाण आणि कुजलेलं आहे की त्याच्या जवळून सुद्धा कोणी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याची गरजच नाही.
- श्रीपाद कोठे
२० ऑगस्ट २०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा