शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

समाजाचा सरकारवर प्रभाव असावा

मोठ्या किराणा दुकानांमधून वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यावर स्वाभाविक चर्चा सुरू आहे. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. परवानगी म्हणजे सक्ती नाही. त्यामुळे सरकारला काय करायचे ते करू द्यावे, पण सुजाण किराणा विक्रेत्यांनी वाईन विकू नये. 'आम्ही वाईन विकणार नाही' अशी किराणा व्यापाऱ्यांनी, 'आपण वाईन विकू नये' अशी बाकीच्या समाज घटकांनी मोहीम चालवावी. पैसे कमावणे वाईट नाही पण त्याला नैतिकतेचा बांध असावा, असा विचार समाजव्यापी होईल असा प्रयत्न करावा. फक्त सरकार सरकार करण्याची सवय टाकून द्यावी. सरकारचा समाजावर प्रभाव नसावा, समाजाचा सरकारवर प्रभाव राहील; याकडे वाटचाल करावी.

- श्रीपाद कोठे

२८ जानेवारी २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा