आपलं मन खरंच शांत आहे का? हे पाहायचं असेल तर एक छोटासा उपाय करायचा. थोडा वेळ नामस्मरण करायचं. हे नामस्मरण ओठ न उघडता किंवा आतल्या आत जिभेची, स्नायूंची काहीही हालचाल न करता; शब्दश: मनातल्या मनात जर होऊ शकलं तर आपलं मन शांत आहे हे निश्चित. पण नामस्मरण करताना ओठ उघडावे लागले किंवा थोडीफार हालचाल करावी लागली तरी समजायचं आपलं मन शांत नाही. मनात काही तरी हालचाल सुरू आहे. हे नामस्मरण ईश्वराचेच असले पाहिजे असे नाही. आपल्या प्रिय व्यक्तीचे सुद्धा असू शकते. अर्थात त्यामुळे फक्त मनाची शांती level कळू शकेल. ईश्वराचे असेल तर शांतीसोबत मनाची उन्नती पण होऊ शकेल.
- श्रीपाद कोठे
२२ जुलै २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा