हिंदुत्ववादी सध्या आक्रमक झाले आहेत का? हो. ते स्वाभाविक आहे आणि काही प्रमाणात समर्थनीय. त्यामुळे एखाद्या घटनेवर मूग गिळून न बसता प्रतिक्रिया देणे, पोलीस तक्रार, प्रती उत्तर इत्यादी बाबींना काही हरकत नाही. पण शिवराळपणा, असभ्यता, अश्लीलता, मानहानी, खोडसाळपणा इत्यादी मात्र टाळलेच पाहिजे. एक लक्षात ठेवायला हवे की, शून्यापासून आजवरचा प्रवास हा समजूतदारपणा, समन्वय, स्नेह यांचा परिणाम आहे. हा प्रवास संपलेला नाही आणि संपायलाही नको. कारण त्याचं लक्ष्य संपूर्ण मानवजात आहे. निवडणूक जिंकण्याएवढी डोकी हे त्याचे लक्ष्य नाही.
- श्रीपाद कोठे
२२ जुलै २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा