सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

आरक्षण

मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा उचल घेतली आहे. आरक्षण या विषयाचा आता चोथाच झाला आहे. मुख्य म्हणजे सगळ्या प्रकारचं आरक्षण हळूहळू संपलं पाहिजे आणि आम्ही आरक्षणविहीन समाज निर्माण करू; असं म्हणण्याची ताकद आणि हिंमत कोणातही नाही. आर्थिक आणि सामाजिक असे आरक्षणाचे दोन पैलू आहेत. त्यातील आर्थिक पैलू हा समन्यायी आर्थिक विकासाशी संबंधित आहे. असा समन्यायी आर्थिक विकास, समन्यायी आर्थिक वितरण करण्याची दृष्टी आणि क्षमताही कोणाकडे नाही. सामाजिक पैलू हा अत्यंत सापेक्ष विषय आहे आणि त्यासाठी एक सुदृढ सामाजिक विचार देण्याचीही कोणाची इच्छा नाही. कुरघोड्या आणि शक्तिसंतुलन या गोष्टी वाईटच आहेत.

- श्रीपाद कोठे

३ सप्टेंबर २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा