कुठे तरी जाणारी कुणाची तरी पालखी. त्यातल्या एका भक्ताने फाटक वाजवले. समोर जाऊन पाहिले. आत आलो. परत समोर जाऊन दक्षिणा त्याच्या हातावर ठेवली. त्याने माझ्याबद्दल सांगणे सुरू केले. पण या प्रकाराचा अनुभव असल्याने आणि आपल्याबद्दल काही जाणून वगैरे घेण्यात रस नसल्याने हात जोडून आत येऊ लागलो. त्याने पेलाभर पाणी मागितले. पक्का चिकटू दिसतो असं मनात म्हणत त्याला पाणी दिलं. पाणी पिल्यावर पुन्हा तो सुरू झाला. मीही एकेक पाऊल मागे येऊ लागलो. शेवटी म्हणाला - 'चिंता करू नका. सगळं व्यवस्थित होईल. कोणालाही तुमचं काही करावं लागणार नाही. प्रकृती सदा उत्तम राहील.' मी आत आलो. तो पुढे गेला. बस्. या प्रसंगातील त्याची शेवटची दोन वाक्ये मात्र आवडून गेली. बाकी कर्ता करविता जाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा