आजच्या मंगळ मोहिमेने आनंदाची अन अभिमानाची लाट आलेली आहे. ती अतिशय योग्य अशीच आहे. ज्याला आनंद आणि अभिमान वाटणार नाही त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. पण उत्साहभरल्या प्रतिक्रियांमधल्या वेगवेगळ्या शब्दातील काही प्रतिक्रिया अशा होत्या ज्यांचा आशय होता- मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाबाबत. आपण आता तरी त्यातून बाहेर पडणार का असा त्या प्रतिक्रियांचा आशय. गंमत वाटली. ज्योतिष्यशास्त्र मानायचं वा नाही, मंगळाचा प्रभाव मानायचा वा नाही; हे मुद्देच वेगळे आहेत. पण आपण मंगळावर पोहोचलो म्हणजे मंगळ त्याचा प्रभाव पाडणे बंद करेल का? माणसाने मिर्चीचे गुणधर्म शोधून काढले किंवा न्यूटनने गुरुत्वाकर्षण शोधून काढलं म्हणजे मिर्ची वा गुरुत्वाकर्षणाने परिणाम करणे सोडले का? आपण मंगळावर पोहोचून विज्ञानात किती प्रगती गाठली ते दाखवून दिले. पण वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला किती शिकलो आहे? वैज्ञानिक वृत्तीसाठी अजून खूप मोठा पल्ला बाकी आहे.
- श्रीपाद कोठे
२४ सप्टेंबर २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा