- तुम्ही संघवाले पण नं.
- का रे?
- काहीही करता आणि त्याचं समर्थन करता.
- काय झालं?
- काल त्या रणवीर, आलियाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं आणि तू त्याचं केवढं समर्थन केलं.
- हा हा हा
- हसतो काय?
- तुला एक माहिती सांगतो. वीसेक वर्षांपूर्वीची. विद्यमान सरसंघचालक त्यावेळी सरकार्यवाह होते. आग्रा येथे संघाचं खूप मोठं शिबिर झालं होतं. सव्वा लाख गणवेशधारी स्वयंसेवकांचं. त्याचं निमंत्रण अनेक लोकांना देण्यात आलं होतं. त्यात श्रीमती सोनिया गांधी यापण होत्या. त्या आल्या नव्हत्याच पण बोलावलं होतं. श्रीमती गांधी यांच्यात काही बदल झाला का माहिती नाही पण वीस वर्षात राजकीय क्षेत्रात किती बदल झाला ते कोणीच कोणाला सांगण्याची गरज नाही. २०-२५ वर्षांनी चित्रपट सृष्टी बदललेली दिसली तर आश्चर्य नको वाटायला.
- ... ... ...
- आणखीन एक सांगतो. खूप जुनं. १९४८ च्या बंदीच्या वेळी ज्या लोकांनी डॉ. हेडगेवार यांच्या समाधीची तोडफोड केली होती ते नंतर संघाचे समर्थक झाले. अन् त्याही पूर्वी अन् त्यानंतरही शाखांवर, स्वयंसेवकांच्या घरांवर दगडफेक करणारे, शाखेत ध्वज लावतात त्याच जागेवर विष्ठा करून ठेवणारे नंतर शाखेत येऊ लागतात. त्यातले अनेक जण चांगले कार्यकर्ते सुद्धा होतात. मला ठाऊक आहे अशी उदाहरणे सगळीकडे सारखी लागू होतातच असं नाही. पण बदलही होतातच.
- श्रीपाद कोठे
९ जानेवारी २०२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा