१४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येला परतले. भरताला त्यांच्या आगमनाची वर्दी मिळताच तो आनंदाने कामाला लागला. त्याने स्वागताची तयारी सुरू केली. काय करायचे त्याचे आदेश आणि सूचना सुरू केल्या. अन् स्वागतासाठी सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी दूतांना, सेवकांना पिटाळले. हे करताना कोणाकोणाला बोलवायचे तेही अंतर्बाह्य साधू असलेले भरत महाराज सांगत होते. त्यावेळी त्यांनी गणिकांनाही बोलवा असे मुद्दाम उल्लेख करून सांगितले. (इति श्रीमद् वाल्मिकी रामायण)
(पोस्टचा उद्देश काहीच नाही. पण २२ तारखेपर्यंत राम राम चालणारच आहे. तर आपण का मागे राहा? खरं तर राम राम अखंडच चालायला हवे. अगदी शिव्या द्यायच्या असतील त्यासुद्धा त्यालाच द्याव्या. रावणाला नाही का मुक्ती मिळाली. विनासायास. तेव्हा... 😀)
- श्रीपाद कोठे
१० जानेवारी २०२४
- आपण काय आहोत, कसे आहोत; हे आपल्यांनाच समजत नाही.
- आपण काय आहोत, कसे आहोत; हे आपल्याला तरी कुठे समजतं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा