चिडलेल्या, त्रासलेल्या, वैतागलेल्या, उबलेल्या माणसाला सबुरीच्या अन समजावणीच्या गोष्टी सांगू नयेत. ते क्रौर्य आणि अपरिपक्वता असते. बहुतेक माणसे तेच करतात अन मग विचारतात - 'मी काय चूक केली?' कारण संवादाचं एकच माध्यम आहे असा अजूनही बहुसंख्य माणसांचा समज आहे. बोलणे, सांगणे, विचारणे यापेक्षा वेगळ्या पध्दतीचे communication असू शकते याचा गंधच नसतो. अन असा वेगळा काही मार्ग असतो हे ऐकून/ वाचून माहिती असले तरीही, तो अवगत नसतो. खरं तर communication त्याच्या तंत्रात नाहीच, संवादाची मुळं, संवादाची सुरुवात मनात होत असते. स्वतःच्या आणि ज्याच्याशी संवाद करतो आहे त्याच्या, अशा दोन्ही मनांच्या मुळाशी पोहोचू शकणाराच प्रभावी आणि परिणामकारक संवाद करू शकतो. नुसतं मनानी चांगलं असणं, कळकळ बिळकळ असणं पुरेसं नसतं. या अंगाने पुष्कळदा जाणवतं की माणूस psycho- socio- cultural evolution च्या संदर्भात अजूनही पुष्कळ प्राथमिक स्तरावरच आहे.
- श्रीपाद कोठे
१९ नोव्हेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा