सरसंघचालकांच्या विदर्भ संशोधन मंडळातल्या भाषणावरून घमासान चर्चा सुरू आहे. ते भाषण आत्ता ऐकलं. त्यावरच्या कमेंट्स आणि चर्चा यावर काही बोलणार नाही. तसंच त्यावर काही लिहावं की नाही यावरही अजून विचार केलेला नाही. पण एक मात्र नक्की नमूद करावं वाटतं की, ते भाषण समजण्याची कुवत आणि क्षमताही फार थोड्या लोकांची असेल. कार्यक्रम कव्हर करायला जाणारे जे बातमीदार असतात त्यांची तर ती क्षमता अजिबातच नसते. वाईट वाटेल पण अगदी थोडे सन्माननीय अपवाद वगळता संपादक मंडळीही त्यासाठी तोकडीच पडतील. पत्रकारितेच्या क्षेत्रात आज असलेली बहुतांश मंडळी अशा विषयांच्या अन् भाषणांच्या दृष्टीने अतिशय सुमार आहेत एवढे नक्की. बाकी एका वृत्तपत्राने त्यात केलेले खोडसाळ राजकारण खरे असले तरीही, पत्रकारांचा बौद्धिक वकूब चिंता करण्यासारखा आहे एवढं खरं. समाजाने प्रसार माध्यमांवरील आपले बौद्धिक अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे.
- श्रीपाद कोठे
९ ऑक्टोबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा