लेखिका मृणालिनी जोशी यांनी आज जगाचा निरोप घेतला. फार काहीच आठवत नाही पण एकदा त्यांना पाहिल्याचं स्मरणात आहे. गोळवलकर गुरुजी यांच्यावरील राष्ट्राय स्वाहा ही कादंबरी लिहीत असताना त्या नागपूरला आल्या होत्या. अन् संबंधितांना, संबंधित स्थानांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्याच निमित्ताने वडिलांना भेटायला त्या घरी आल्या होत्या. जवळपास दोन तास वडील आणि त्यांच्यात गुरुजींविषयी बोलणं झालं होतं. गुरुजींच्या आठवणी, स्वभाव, वेगवेगळे पैलू असं ते बोलणं होतं. राष्ट्राय स्वाहा या कादंबरीच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात वडिलांचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे. त्यावेळी मी अगदीच लहान शाळकरी मुलगा होतो. त्यामुळे बाकी काही स्मरणात नाही. मृणालिनी जोशी यांना अभिवादन. ॐ शांति: 🙏
- श्रीपाद कोठे
२७ ऑक्टोबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा