आज जागतिक अन्न दिवस आहे.
हजारो वर्षांपूर्वी भारताने 'अन्नं ब्रम्हेति' म्हणून अन्नाचा गौरव तर केलाच पण त्याचे मूलभूत महत्त्वही अधोरेखित केले. उपयुक्तता विचारातून एखाद्या गोष्टीचे महत्त्व असतेच. त्या गोष्टीबद्दल जबाबदारीची भावना आणि कर्तव्य भावनाही त्यातून काही प्रमाणात निर्माण होतेच. परंतु उपयुक्ततेसोबत त्याबद्दल पावित्र्याची भावना असेल तर त्या गोष्टींबाबत कृतज्ञता आणि सन्मान भावना देखील फार वरच्या दर्जाची उत्पन्न होते. अन्न दिनाच्या उपयुक्ततेला भारताने अन्नाला दिलेल्या पावित्र्याची जोड देऊन ती जगभरात रुजवू या.
- श्रीपाद कोठे
१६ ऑक्टोबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा