हरी नरके यांनी डॉ. कलाम यांच्याबद्दल आज काही विधान केले. त्यावर नाराज झालेल्या अनेकांनी नरके यांच्यावर विचित्र टीका केली आहे. एक विचारावं वाटतं की, अशा प्रतिक्रिया डॉ. कलाम यांना आवडल्या असत्या का? डॉ. कलाम यांनी ज्या माणसाची, ज्या भारतीयाची अपेक्षा केली होती त्याला धरून ही टीकाटिप्पणी आहे का? संयम सोडणे, आक्रस्ताळेपणा, कर्कशपणा, काही म्हटलेलं अजिबात सहन न होणे; हे कशासाठी? डॉ. कलाम वा तत्सम अन्य कोणी आणि त्यांनी मांडलेले विचार, केलेल्या अपेक्षा यांचे आम्ही फक्त प्रचारक आहोत की अनुयायी? दुर्लक्ष करण्याची आणि विरोध सुद्धा सौम्य परंतु ठाम करण्याची सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक वेळी अवास्तव आक्रमकता योग्य नसते. हातावर बसलेली माशी उडवायला तलवार काढणे हास्यास्पद असते.
- श्रीपाद कोठे
१५ ऑक्टोबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा