कवीकल्पना ही कवीकल्पना असते अन वास्तव ते वास्तव. आता बघा नं - ऋतुसंहारमध्ये कालिदास ग्रीष्माबद्दल काय म्हणतो? ग्रीष्माच्या दाहकतेचा (उन्हाचा) ताप इतका असतो की कट्टर वैरी आपले वैर विसरून जातात. तो उदाहरण देतो - उन्हाने पोळलेला साप मोराच्या पिसाऱ्याच्या सावलीत जाऊन बसतो. सापालाही भीती वाटत नाही अन मोरालाही दुर्लक्ष करावसं वाटतं. कारण दोघेही पोळलेले असतात. पण आज... निसर्ग, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सगळंच तापलेलं असून अन सगळ्यांनाच झळा बसत असूनही वैर काही संपत नाही. असो. कालिदास असो की ज्ञानेश्वर, कवी लोक आपले मार्ग दाखवतात आपल्या प्रतिभेच्या बळावर. कवीचं ऐकावंच असा नियम तर नाही ना?
- श्रीपाद कोठे
२८ फेब्रुवारी २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा