बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

लोकमत कार्यक्रमात सरसंघचालक

लोकमतच्या कार्यक्रमातील सरसंघचालकांच्या भाषणाच्या कार्यक्रमाचे कवित्व बराच काळ सुरू राहणार आहेच. ते चांगलेही आहे. नाही तरी 'हिंदू विचार का हो, सम्यक समूह मंथन' हीच संघाची भूमिका आहे. त्यामुळे तसे होणे वावगे नाहीच. अन मंथन म्हटल्यावर वेगवेगळी मते आलीच. प्रश्न उत्तरे आलीच. असेच काही प्रश्न लोकमतचे मालक श्री. विजय दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थित केले होते. त्यातला एक प्रश्न होता - 'हिंदुत्वाची कोणती व्याख्या योग्य? सावरकरांची? संघाची? बाळासाहेब ठाकरे यांची? की राहुल गांधी यांची?'

याबाबत दोन गोष्टी सांगता येतील. एक म्हणजे, संघाने हिंदुत्वाची व्याख्याच केलेली नाही. अन दुसरे म्हणजे, व्याख्येचं काही एक महत्व असलं तरीही व्याख्या म्हणजे काही फार मोठी किंवा अत्यावश्यक गोष्ट नाही. 'कविता' या गोष्टीच्या अनेक व्याख्या आहेत. त्याने कवितेला काहीही फरक पडत नाही. एकाच 'कविता' या सत्याचं प्रत्येक जण आपापलं वर्णन करतो. अन कविता करणारे तर त्या व्याख्या वगैरेंच्या फंदात पण पडत नाहीत. 'जीवन' या सत्याचंही असंच आहे. व्याख्या ही गोष्ट त्यासाठी irrelevant आहे. निरर्थक आहे. सध्या वातावरणात प्रेमाचा माहोल आहे. त्याचंही तसंच. अनेक गोष्टी एक तर व्याख्येपलीकडच्या असतात किंवा व्याख्या या गोष्टीला काही महत्व नसतं. हिंदुत्व तसं आहे.

- श्रीपाद कोठे

बुधवार, ९ फेब्रुवारी २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा