बहुतेक सगळ्या समस्यांचं कारण secular विचार हेच आहे. अगदी सध्याच्या युक्रेन समस्येचं कारण सुद्धा. युद्ध होईल वा न होईल ते लवकरच स्पष्ट होईल. पण युद्ध झाले तरी वा न झाले तरी; भारतासहित जगभरातील सामान्य माणसाच्या समस्या, सामान्य माणसाचे त्रास वाढतीलच. हा तणाव निवळावा किंवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी ज्या उपायांची चर्चा करण्यात येते; त्यांचा पायासुद्धा secular विचार हाच आहे. कारण, राजकारण यांची खूप चर्चा होते आहे अन होईल. Diplomacy आणि strategy, लष्करी तयारी आणि डावपेच; यांची सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाणारी चर्चा होईल. ही किंवा ती बाजू घेऊन अभिनिवेशपूर्ण वाद होतील. शौर्याच्याही गोष्टी होतील. या सगळ्या गदारोळात मूळ गोष्टीवर लक्ष देणारे, बोलणारे कोणाच्या खिजगणातीत सुद्धा राहणार नाहीत. आजवर येऊन गेलेल्या लाखो वादळांप्रमाणे वादळ येईल, नुकसान करेल, अन निघून जाईल. माणूस रडेल वा पाठ थोपटून घेईल. मानवी सभ्यतेचं पाऊल जिथल्या तिथेच राहील. कारण secular विचारांवर उभं असलेलं मानवी जीवन तसंच राहील. मी Secular विचार म्हणतो त्याचा अर्थ शब्दकोशात असलेला त्याचा अर्थ. (सेक्युलर, फेक्युलर इत्यादी बोलणारे सुद्धा बहुतांश secular विचारच करतात.) अपवाद वगळता आजचं ज्ञान, आजचं शिक्षण, आजचे विचार आणि विचारपद्धती, आजच्या व्यवस्था, या सगळ्यांच्या मुळाशी असलेल्या धारणा, समज, मान्यता इत्यादी; सगळ्यांचा आधार secular विचार आहे. Secularism ला विरोध करणाऱ्यांचेही विचार secular च आहेत. या secular mindset मधून बाहेर पडणं हाच उपाय आहे. हे कसं होईल हा मात्र यक्षप्रश्न आहे.
- युक्रेनने NATO मध्ये सहभागी व्हावं हा किंवा रशिया व जर्मनी यांना जोडणारी समुद्रतळाची तेलाची पाईपलाईन हा; यातील कोणताही विषय जगाला वेठीला धरावं एवढा मोठा नक्कीच नाही. यातील काहीही झालं वा नाही झालं तरी काय होणार आहे? मानवातील पशुत्व संपेपर्यंत असे प्रश्न सुटणार नाहीत.
- श्रीपाद कोठे
१५ फेब्रुवारी २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा