गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

अराजकीय चर्चा

टीव्हीवरील चर्चा हा नेहमीच टीकेचा विषय असतो. मीही त्यावर बहुतेक टीकाच करतो. पण कधीकधी चांगलं काही पण ऐकायला मिळतं. आज CNBC वर झालेली चर्चा अशीच होती. एक तर ती चर्चा होती, भांडण नव्हतं. दुसरं म्हणजे त्याचा विषयही राजकीय नव्हता आणि चर्चा करणाऱ्यात एकही राजकीय व्यक्ती नव्हती. दोन विषयांवर अर्धा अर्धा तास चर्चा झाली. एक विषय शिक्षण आणि दुसरा आरोग्य. १९४७ पासून आजपर्यंत या दोन्ही क्षेत्रातील विकास आणि त्याचे आजचे स्वरूप अशी चर्चा होती. सगळ्यांना या दोन्ही गोष्टी चांगल्या, दर्जेदार, परवडणाऱ्या कशा मिळतील ही चर्चेची दिशा होती. या चर्चेवर आणि त्यातील बिंदूंवर पुष्कळ लिहिता येईल, पण चर्चा ऐकत असताना मनात आलेले दोनच बिंदू सगळ्यांच्या विचारार्थ.

१) राजकीय व्यक्ती कटाक्षाने पूर्णपणे बाजूला ठेवून चिंतन, चर्चा, विचार केल्यास खूप चांगलं काही घडू शकेल.

२) सगळा विचार करता - पाच लाख लोकवस्तीची तीन ते पाच हजार शहरे विकसित करणे हे पुढील पाच दशकांचं लक्ष्य ठेवायला हवं. त्यासाठी ज्या ज्या गोष्टींवर पाणी सोडावे लागेल ते सोडण्याची संकल्पशक्ती तयार करावी लागेल. त्यात प्रत्येकाला भरपूर काही मिळेल आणि पुष्कळ काही सोडावे लागेल.

पण चांगलं स्वप्न पाहायचं असेल अन ते प्रत्यक्षात यायचं असेल तर हे करावंच लागेल नं?

- श्रीपाद कोठे

४ ऑगस्ट २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा