गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

मनुवादी??

जातपात, ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद, आरक्षण हे विषय सतत चर्चेत असतात. त्यालाच जोडून मनुस्मृती असते. त्यातूनच `मनुवादी' असा शब्द आला. एक विचार आला- जगातील कोणताही हुकुमशाह धड एखादं तपसुद्धा टिकला नाही. मग मनुस्मृती कशी टिकली असावी? सम्राट अशोक, बौद्ध मताचा विस्तार, शीख पंथ, वारकरी संप्रदाय, शिवाजींची प्रशासन पद्धती इत्यादी किती मोठा अन किती विविधांगी काळ आहे भारताच्या इतिहासात. इंग्रजांची १५० वर्षे अन स्वातंत्र्याची ६८ वर्षे या उण्यापुऱ्या सव्वादोनशे वर्षांचा तर प्रश्नच नाही. त्या काळात मनुस्मृतीची मातब्बरी काय होती? काय असेल? मनुस्मृती लागू करावी वगैरे मला मुळीच म्हणायचे नाही. पण आम्ही किती भुसभुशीत विचार करतो असे वाटले. थोडी वैचारिक घुसळण केली तर अभिनिवेश थोडे कमी होतील का? मला तसे वाटते.

- श्रीपाद कोठे

१ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा