शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

ठेकेदार

'गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून' या साहित्य संमेलनातील परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आहेत. यावरून अनेकांचा पोटशूळ उठला आहे. सगळी गंमतच म्हणायची. गांधी विनोबा यांच्यावरचा एकाधिकार संपण्याची भीती हे कारण तर आहेच. पण या हताशेत आपलीच वैचारिक विसंगती कळू नये एवढ्या तळाशी लोक गेले आहेत हे दुर्दैव आहे. विचारांची मांडणी, चिकित्सा वगैरे तर खूपच दूर; पण साधी सोबत, समन्वय, एकत्र येण्याची इच्छा; या प्राथमिक मानवीय गोष्टी सुद्धा आंधळ्या द्वेषापायी आपण सोडून देत आहोत हेही अशा लोकांना लक्षात येऊ नये? अन् तरीही गांधी विनोबांचे आपणच ठेकेदार आहोत हा दंभही सुटू नये? खरंच हे जग मोठं गमतीशीरच आहे.

- श्रीपाद कोठे

३ फेब्रुवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा