अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाशिवाय होऊच द्यायचे नाही असा काही लोकांचा कावा आहे की काय अशी शंका वावगी ठरू नये. यावर्षी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यावरून वादाला संधी न मिळाल्याने; भूमिपूजन, दिंडीतल्या पताका, भाजप नेत्यांच्या हातून सत्कार किंवा पैसा स्वीकारूनही गांधींच्या मारेकऱ्यांचे खुसपट काढणे; असे प्रकार भूषणावह नाहीत. आम्ही म्हणतो त्याच पद्धतीने जग चालायला हवं, असा हेका ही विकृती आहे. ज्या ज्या वेळी, ज्या ज्या ठिकाणी, जे जे लोक असतील; त्यांच्या आवडी, इच्छा, पद्धती, मान्यता, धारणा; यानुसार ते ते प्रसंग होऊ द्यावे. आपल्या हाती सूत्रे असतील तेव्हा आपल्या पद्धतीने करावे. पण विनाकारण वाद घालणे, संघर्ष करणे, बरोबर आणि चूक यांचा निवाडा करणे; हे हास्यास्पद आणि चीड आणणारे असते. हेकेखोरांनी थोडे सहिष्णू व्हावे आणि सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा मान राखावा.
- श्रीपाद कोठे
२ फेब्रुवारी २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा