नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार श्री. विनोद देशमुख यांनी स्व. मा. गो. उपाख्य बाबुरावजी वैद्य यांच्यावर एक छोटासा लेख आज लिहिला आहे. स्व. बाबुरावजींचे वाचन असा विषय आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी सुद्धा ते कसे वाचत तेही त्या लेखात आहे. एक मनात आलं - प्रत्येकाने रोज किमान दहा पानं तरी वाचावीत. प्रत्येकाच्या वाचण्याच्या गतीनुसार कमीजास्त वेळ लागेल. पण कितीही सावकाश वाचणारा असला तरी फार जास्त वेळ नाही लागणार दहा पानांसाठी. म्हणजे वर्षभरात तीन साडेतीन हजार पाने वाचून होतील. वर्षभरात दहा, बारा पुस्तके. त्याचा स्वतःला आणि समाजालाही फायदा होणारच नं. अन वाचण्यासाठी महिन्याला एक पुस्तक विकत घेण्याचं ठरवलं तर प्रकाशन व्यवसायाचं पण भलं होईल. ग्रंथालयाचा वापर करून वाचत राहिलं तर ग्रंथालयेही बाळसं धरतील. रोज फक्त दहा पाने.
- श्रीपाद कोठे
शनिवार, ११ मार्च २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा