गुरुवार, ९ मार्च, २०२३

अरे संसार संसार...

भाजी चांगली आहे, भाजी स्वस्त आहे; ही काय भाजी घेण्याचा आग्रह करण्याची कारणं असू शकतात का? बरं, भाजी घेतल्यावर मिरच्या, कोथिंबीर घ्यायलाच पाहिजे; हा नियम कसा होऊ शकतो? मी एकटाच राहतो. त्यामुळे मुळात माझी गरज कमी असते. भाजी वाया जाण्याचीही (सुकली, सडली इत्यादी) शक्यता असतेच. पुन्हा त्यात घालवायला माझ्याकडे फारसा वेळही नसतो. सगळं साग्रसंगीत करण्याची हौसही फार नाही. स्त्री आणि पुरुष यांच्या विचार करण्यात, कामं करण्यात सुद्धा फरक असतो. हे सगळं भाजीविक्यांना कसं समजवायचं अन ते कायम त्यांच्या डोक्यात राहील यासाठी किती वेळा समजवायचं? संसार नसणाऱ्यांचा संसारही कटकटीचाच असतो राजेहो.

- श्रीपाद कोठे

१० मार्च २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा