मंगळवार, २१ मार्च, २०२३

अस्मिता : भारतीय, अभारतीय

अस्मिता व्यक्त होण्यासाठी आणि वर्चस्व गाजवण्यासाठी धडपडत असते. मानवाची अस्मिता काय आहे? या प्रश्नाचं भारतीय आणि अभारतीय उत्तर वेगवेगळं आहे अन त्याचे परिणामही वेगळे होतात. मानवाची अस्मिता सत्ता, संपत्ती, सौंदर्य इत्यादी बाह्य गोष्टीत असल्याचे भारतबाह्य विचार आणि समाज शिकवतात, सांगतात, प्रतिपादन करतात. यातून समस्याच समस्या निर्माण होतात. भारतीय विचार अस्मिता स्वतःत असल्याचे; बाहेर नसल्याचे सांगतात, शिकवतात, प्रतिपादन करतात. भारतबाह्य अस्मितेची कल्पना 'माझे'वर अवलंबून आहे, तर भारतीय अस्मितेची कल्पना 'मी'वर अवलंबून आहे. म्हणूनच भारतबाह्य विचार 'माझे' गोळा करायला, वाढवायला, शोधायला शिकवतो. भारतीय विचार 'मी' गोळा करायला, वाढवायला, शोधायला शिकवतो. थोडं वाईट वाटेल, जरा धक्काही बसेल; पण देशसुद्धा अभारतीय अस्मिता आहे. रशिया, युक्रेन हे त्याचेच उदाहरण आहे.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा