शनिवार, २२ एप्रिल, २०२३

संघटना आणि समर्पण

काल एका पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया -

संघटना हे एक यंत्र असतं अन समर्पण हा भाव असतो. यंत्राला भाव समजत नाही. संघटन वाढवणे आणि कार्यकर्त्यांची मानसिकता घडवणे यासाठी भाव असतो. पण जीवनाचा व्यवहार हा एक तिसरा घटक असतो. हा लक्षात घेऊन सगळा विचार करावा लागतो. पण जीवन दुर्लक्षित करून भाव पक्ष गृहीत धरला जातो तेव्हा संघटनही उरत नाही, भावही नासतो आणि पांथिकतेकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीप्रमाणेच संघटनेच्या वाढीचेही टप्पे असतात. त्या त्या टप्प्यांवर अनेक गोष्टींची पुन्हा पुन्हा मांडणी करावी लागते. जुन्या घराची दुरुस्तीच म्हणा ना. त्याऐवजी भंपक आदर्शवाद सांगत राहिलं तर काहीही साध्य होऊ शकत नाही. पुण्याई पण लयास जाते.

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा