- अणुबॉम्बचा वापर क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिटलरने केला नाही.
- स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा उभारणाऱ्या अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केला.
- ज्या विमानातून हिरोशिमा शहरावर 'लिटिल बॉय' टाकण्यात आला, त्या विमानाला त्याच्या पायलटने आपल्या आईचे नाव दिले होते.
- आईवर प्रेम करणाऱ्या त्या पायलटने लाखो आयांना यमसदनी पाठवले आणि लाखो आयांना अनाथ केले.
- एका क्षणात लाखो माणसे मारून टाकणाऱ्या अमेरिकेला कोणीही नावे ठेवीत नाही.
- अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या आईन्स्टाईनने अणुबॉम्ब वापरू नये यासाठी प्रयत्न केले होते. पण विज्ञानात अभूतपूर्व क्रांती घडवणारे आईन्स्टाईन माणसांच्या (राज्यकर्ते, सेना) मनात किंचितही बदल घडवू शकले नाही.
- 'मानवी सभ्यता' अणुबॉम्बचे अधिक घातक आणि अधिक अचूक अवतार तयार करू शकली आणि करते आहे.
- आपल्याचसारखी माणसे मारू नये एवढी संवेदना मात्र 'मानवी सभ्यता' निर्माण करू शकली नाही.
- बळी हा बोकडाचाच दिला जातो, वाघाचा नाही. देवही दुर्बलांचा घात करतात. पण हा जंगलाचा आणि मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेतील न्याय आहे. जी काही मानवी सभ्यता विकसित झाली ती या न्यायाच्या विरोधात जाऊनच विकसित झाली आहे.
- जंगलाचा न्याय मान्य करूनच साम्यवाद विकसित झाला आणि त्याने 'आहे रे, नाही रे' यांचा संघर्ष उचलून धरला.
- भांडवलशाहीने जंगलाचा न्याय मान्य केला आणि 'बळी तो कान पिळी' हे तत्त्व उचलून धरले.
- दोन हजार वर्षांपूर्वीच्या सिकंदराच्या विश्व जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने जन्माला घातलेल्या ख्रिश्चन, इस्लाम, लोकशाही इत्यादींनी; जंगलाच्या न्यायावरच आपापले तत्त्वज्ञान विकसित केले.
- जंगलाच्या न्यायाविरुद्ध जाणाऱ्या भारतीय समाजावर पुन्हा जंगलाचा न्याय लादण्यात आला.
- लादलेल्या स्थितीचा सामना करत, जंगलाच्या न्यायाच्या जागी त्याला विरोधी तत्त्व जगात प्रतिष्ठित करणे, हे भारतापुढील आव्हान.
- अन्यथा जंगल उजाड होईल.
- श्रीपाद कोठे
८ एप्रिल २०२२
(पॉल टीबतस हे पायलटचे नाव। तो टाकणार असलेला बॉम्ब हा अणुबाँब असल्याचे त्यालाही माहीत नव्हते। नेहमीपेक्षा मोठा आहे, काळजीपूर्वक टाक, एव्हढेच त्याला सांगितले गेले। नंतर झालेला विध्वंस पाहून तो ठार वेडा झाला। - राजेश एकनाथ जोशी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा