बुलढाणा जिल्ह्यात हिंदू बांधवांनी मुस्लिमांना भोंगा भेट दिल्याची एक बातमी पाहिली. Gesture वगैरे ठीक पण तद्दन अविचारी कृती. राजकारणाने हा प्रश्न हिंदू विरुद्ध मुसलमान असा केला. पण समाजाने अक्कल गहाण ठेवावी का? मोठमोठ्या आवाजात भोंगे वाजवणे, रस्त्यावर किंवा कुठेही सामान्य व्यवहारात अडथळे येतील अशा कृती; हे चांगले की वाईट? हे योग्य की अयोग्य? मग जे चांगले, जे योग्य त्यासाठी सगळ्यांना तयार करायला हवे की नको? राजकारणी राजकारणच करणार. त्यांना तेच करायचे असते. त्यासाठी विधिनिषेध नसतात. तुमची आमची काय मजबुरी आहे? आपली आपल्याला लाज वाटणं पुन्हा सुरू व्हायला हवं आहे.
- श्रीपाद कोठे
३ मे २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा