ज्ञानी (आध्यात्मिक अर्थाने) माणसाची लक्षणे निश्चित सांगता येत नाहीत. गीतेत सुद्धा ज्ञानयोग असा अध्याय नाही. ज्ञानविज्ञान योग आहे, पण ज्ञानयोग नाही. कारण तो माणूस अमुक गोष्टींवरून ओळखता येत नाही. विशिष्ट वेष, विशिष्ट कर्म, विशिष्ट साधनापद्धती, मठ, मंदिर, ईश्वरी प्रतिमा, दैनंदिन आचरण; इत्यादी काहीच सांगता येत नाही. या बाह्य गोष्टीतील काही असेल किंवा नसेल. अनेकदा, विशेषतः विकासाच्या पुढील पुढील अवस्थेत यातील काहीच नसतं. त्यामुळे ज्ञानी व्यक्तीची आध्यात्मिकता समजत नाही. अनेकदा तर तो सामान्यच वाटतो किंवा अतिशय सामान्य. ज्ञानी व्यक्तीला त्याने फरक पडत नाही. परंतु त्याचं आकलन न झाल्याने त्याच्याशी जो व्यवहार केला जातो वा जे संबंध निर्माण होतात; त्याचा मात्र त्याला त्रास होतो. कारण व्यवहार आणि संबंध म्हटले की; इच्छा, अपेक्षा, मागण्या, समज, perception अशा अनेक गोष्टी येऊन आदळत असतात. त्यांनी विघ्न निर्माण होते. ज्ञानी साधकासमोर ही मोठी समस्या असते. येणारा भविष्यकाळ ज्ञानमार्गाचा असेल. पण त्यातल्या या अडचणींमुळे हा प्रवास गोंधळ आणि गुंतागुंतीचा राहील.
- श्रीपाद कोठे
१४ जुलै २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा