'रेवडी कल्चर' आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. अनेक मुद्दे समोर येतील. अनेक विषयांवर चर्चा होईल. यात भाजपसह सगळ्याच पक्षांची कसोटी लागणार आहे. एक मुद्दा सहज मनात आला. सध्या फक्त तेवढाच.
- गरजूंना मदत वा सवलती द्याव्या. बाकीच्यांना नको. हे बरोबरच आहे. पण पाचेक हजार कमावणाऱ्यांना साखर ४० रुपये किलो, पेट्रोल १०० रुपये लिटर... ... ... अन लाखो किंवा करोडो कमावणारे किंवा देशातले पहिले अमुक इतके श्रीमंत यांनाही साखर ४० रुपये किलो, पेट्रोल १०० रुपये लिटर... ... ... याचाही विचार व्हायला हवा.
************
एक इशारा : भाजपचे अश्विनी उपाध्याय यांनीच याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अन या फुकट संस्कृतीवर आळा नाही घातला तर भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ शकेल, असेही त्यात म्हटले आहे. समर्थकांनी किती अन कसे समर्थन करत राहायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
- श्रीपाद कोठे
२७ जुलै २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा