रविवार, १६ जुलै, २०२३

सुमार विद्वान

नागपुरात काल एक कार्यक्रम झाला. चार-पाच वक्ते बोलले. विषय होता - संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल का? एका विद्वान वक्त्याचे भाषण ऐकले. मी कार्यक्रमाला गेलो नव्हतो आणि सगळी भाषणेही ऐकली नाहीत. पण जे ऐकले ते इतके सुमार होते आणि विषयाला सोडून होते की, अशा लोकांबद्दल काय म्हणावे? भूईला भार एवढेच म्हणता येईल. ते संघाचे विरोधक आहेत हा मुद्दा नाही, त्यांची अपार निरर्थकता हा मुद्दा आहे. असो. त्या निमित्ताने एक मुद्दा पुन्हा विचारार्थ ठेवावासा वाटतो. त्यात धर्म हा विषय येणे स्वाभाविक होते. अन धर्म या शब्दाचा उपयोग त्या वक्त्यांनी रिलीजन याच अर्थाने केला. हे सर्रास झाले आहे. त्याचे कोणास काही वाटत नाही. प्रश्न विद्वानांचा आहे. ते मुजोरी करतात. त्यांच्यासाठी एक प्रश्न धर्म म्हणजे जर रिलीजन तर पंथ आणि संप्रदाय म्हणजे काय? पंथ, संप्रदाय कशाला म्हणायचे? त्यांची लक्षणे काय? मी ज्या वक्त्यांची चर्चा करतो आहे असे लोक समाजाच्या सुमारीकरणासाठी अन अध:पातासाठी कारण असतात.

- श्रीपाद कोठे

१७ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा