अनेकांना आवडणार नाही, रागही येईल. बाकी, मी कामातून गेलो आहे यावर तर आता बहुतेक शिक्कामोर्तब झालं आहे. तरी एक मनात आलेला विचार पुढे ठेवतो.
नेपाळमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत. वर्तमान स्टेटस माहिती नाही पण त्यांच्या घटनेतही नेपाळ हिंदू राष्ट्र असल्याचे घोषित केले होते. तरीही आज नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणता येईल का? सत्ता, संपत्ती आणि सुरक्षा एवढ्या बळावर राष्ट्र म्हणून एखादा समाज उभा राहतो आणि टिकतो का? या गोष्टी कधी दगा देतील याचा काय भरवसा? नेपाळकडे या तिन्ही गोष्टी नाहीत म्हणूनच त्याची आजची गत झाली असं म्हणता येईल. पण या तिन्ही गोष्टींचं जाणंयेणं तर सुरूच राहतं. त्या नसतानाही वा त्यांना धक्का लागल्यावरही तो समाज राष्ट्र म्हणून टिकायचा असेल तर वेगळं काहीतरी लागतं हे स्पष्ट आहे. सत्ता, संपत्ती, सुरक्षा, संख्या यापेक्षा वेगळं असं तत्व आहे जे राष्ट्र घडवतं. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असं म्हणताना ते तत्व अभिप्रेत असतं. त्याकडे जरा दुर्लक्ष झालेलं आहे. कारण नेपाळ असो वा श्रीलंका हिंदू समाज हिंदुत्व वा राष्ट्रीयत्वाचे ते मूलतत्व सांभाळू आणि विकसित करू शकला नाही. भारतात काय होईल?
मी ज्योतिषी नाही.
- श्रीपाद कोठे
१७ जुलै २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा