अनेक दिवसांनी आज चर्चा ऐकली. सुसह्य होती म्हणून. प्रा. शरद कोहली हे एक अर्थतज्ज्ञ आहेत. टीव्ही चर्चांमध्ये अनेकदा येतात. त्यांच्या मते इथून पुढचा काळ आर्थिक दृष्टीने आणखीन कठीण राहणार आहे. कल्पना करता येणार नाही असा. भारतातील inflation जगाच्या तुलनेत खूपच नियंत्रणात आहे असंही मत त्यांनी मांडलं. तरीही काळ कठीण राहणार हे त्यांचं मत होतं. प्रा. कोहली हे उजवे, भांडवलवादी, भाजपच्या धोरणांचे समर्थक समजले जातात. यावर उपाय काय या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते. सगळ्या तज्ज्ञ लोकांची म्हणूनच नेहमीच गंमत वाटते. ते फक्त शास्त्राच्या चौकटीत बोलतात आणि विचार करू शकतात. Original thinking शून्य म्हटलं तरी चालेल. त्यांना अन्य काही सुचतच नाही. अन समजतही नाही. ही एक विडंबना आहे. सगळ्या अर्थकारणाची मुळातून फेरमांडणी करण्याची गरज आहे. गेली काही दशके तरी ही गरज जाणवते आहे पण कोणीही... अगदी कोणीही (भाजपसह) त्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाही. बाकी आकडे, तर्क अन भांडणे माझ्या दृष्टीने अर्थशून्य आहेत.
By the way - पश्चिम बंगालमध्ये कॅश मोजणे सुरू आहे. अशा शेकडो बातम्या येत असतात. गेल्या दहा वर्षात अशा प्रकारे जप्त केलेली संपत्ती किती आहे आणि त्याचे काय केले, हे जाहीर व्हायला हवे. (तसे जाहीर झाले असेल वा होत असेल तर सांगावे.) अन देशातल्या प्रत्येक घराची अन सरकारी, गैरसरकारी, कॉर्पोरेट इमारतींची अशीच झडती घेऊन एकदा सोक्षमोक्ष लावून टाकावा. सुरुवात नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या अन उद्योगपतींच्या घरांपासून करावी. तसेच tds चे चिंधी अर्थकारण करण्यापेक्षा सगळ्या बँका आणि वित्तसंस्थांचे सगळे लॉकर्स तपासावे.
- श्रीपाद कोठे
२३ जुलै २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा