बीफ खाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, असे मत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते दलित असल्याने त्यांचा प्रतिवाद केला तर लगेच त्याला जातीय रंग दिला जाऊ शकेल. तरीही एक प्रश्न विचारावासा वाटतो. बीफ तर दूरची गोष्ट, मांसाहार बौद्ध जीवन पद्धतीत बसेल का? दलित समाज मोठ्या प्रमाणात बौद्ध मतानुयायी आहे. अहिंसा हे ज्याप्रमाणे जैन संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे तसेच बौद्ध संप्रदायाचे देखील आहे. आज बौद्ध संप्रदाय केवळ राजकीय अंगानेच पाहिला जातो. उच्चवर्णीय द्वेष, आरक्षण, स्मारके, राजकीय शक्तीगट हेच स्वरूप राहिले आहे. जीवनपद्धती म्हणून त्याचा विचार होतच नाही. सुरापान, मांसाहार किंवा एकूणच पंचशील वगैरेचा विचार होत नाही. बौद्ध मताचा जीवन पद्धती या अंगाने विचार व्हायला हवा असे वाटते.
- श्रीपाद कोठे
१७ जुलै २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा