शनिवार, १० डिसेंबर, २०२२

भुर्दंड

नागपूरचा शुक्रवार तलाव (गांधीसागर तलाव) रिकामा करण्याचं काम सुरू आहे. स्वच्छता आणि नवीन कामे या दोन कारणांसाठी. ही चांगली गोष्ट आहे. हा जुना तलाव एक चांगले स्थळ होईल अशी आशा करू. अशी आशा करतानाच एक गोष्ट मात्र खटकते. ती म्हणजे, यापूर्वी जी जी कामे झाली, सौंदर्यीकरण झालं, व्यावसायिक सुविधा झाल्या; ते सगळं मातीत गेलं आहे. बरं, या साऱ्या गोष्टींचा पुरेसा वापर करून झाल्यावर त्या मातीत गेल्या तर काही वाटणार नाही. मात्र याआधीच्या सगळ्या गोष्टी वापर/ उपयोग न होताच वाया गेल्या. त्यावर झालेला खर्च हा नागरिकांवर एक प्रकारे भूर्दंडच नाही का? शुक्रवार तलाव हे एक उदाहरण झाले पण अशी असंख्य उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला, अनुभवायला मिळतात. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी 'आम्ही अमुक केले' हे सांगण्यापुरत्या आणि हे सांगण्यासाठीच केल्या जातात की काय असे वाटते. या भुर्दंडाचा गंभीरपणे विचार व्हायला नको का?

- श्रीपाद कोठे

११ डिसेंबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा