शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

विरक्ती

'हे जग नश्वर आहे', 'या जगात काही राम नाही', 'हे जग क्षणिक आहे'... हे कधी ना कधी कानी पडतं. कधी तरी जाणवतं. त्यामुळे ते माहीत असतं. अर्थात या विचारांचा वाराही न लागलेले सुद्धा असतातच. पण आपण बोलतोय ज्यांना हे कुठेतरी मनाला, बुद्धीला स्पर्श करून जातं त्यांच्याबद्दल. मात्र हे फक्त माहिती झाल्याने विरक्ती येत नाही. ही नश्वरता प्रत्यक्ष जीवनच असावं लागतं, ती क्षणिकता श्वास निश्वास असावा लागतो, हे निरर्थकत्व प्रत्यक्ष अनुभूत असावं लागतं; तेव्हा विरक्तीचा उदय होतो. ही विरक्ती हेच अवधूत अवस्थेचं पहिलं पाऊल ठरतं. यातील काहीही ठरवून होत नाही. ध्येय वगैरेला इथे वाव नसतो. असं होतं तेव्हा आपोआप होतं किंवा होतच नाही. मोठी मजेशीर असते ही विरक्ती.

(आठवडाभर भगवान दत्तात्रेयांचा जागर चालणार आहे. त्या अनुषंगाने सहज आलेलं काहीतरी.)

- श्रीपाद कोठे

४ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा