रविवार, ११ डिसेंबर, २०२२

कायदा व विश्वास

रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांची एक आठवण संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी यांनी नोंदवली आहे. बाळासाहेब तामिळनाडू प्रांतात एका शिबिरात गेले होते. नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तरे झाली. एका स्वयंसेवकाने संघाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बाळासाहेबांचं उत्तर महत्वाचं आहे. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या स्वयंसेवकाला त्याची माहिती विचारली. मग त्याला म्हणाले, 'तुमच्या घराची कागदपत्रे असतील. ती तुम्ही पाहिली का?' तो नाही म्हणाला. बाळासाहेब पुढे म्हणाले, 'तरीही कागदपत्रे असणारच. ती काढण्याचं, त्यांची चर्चा करण्याचं प्रयोजन तेव्हाच येईल जेव्हा, तुम्हा चार भावांना काही हवं आहे. जोवर काही नको असेल तोवर कपाटातल्या कागदांची आठवण येत नाही.' पुढे म्हणाले, 'आपल्या घटनेची प्रत कार्यालयात उपलब्ध असते. तुम्ही पाहू शकता.'

मानवी जीवन आणि कायदे, नियम याबद्दलचं मूलभूत चिंतन स्व. बाळासाहेबांच्या या उत्तरात आहे. आज सर्वत्र जो discourse चालतो तो पाहून वारंवार या प्रसंगाची आठवण येते. विश्वास आणि निखळ मन... That's all.

- श्रीपाद कोठे

१२ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा